Download App

Aditya Thackeray : चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आलं नाही

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धनुष्यबाण आणि पक्ष नावाबाबत गांभीर्यानं सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission)जो निर्णय आला त्याला आम्ही चॅलेंज केलंय. आम्हाला वाटतं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज (Compromise) झालेलं आहे. ही लढाई फक्त आता शिवसेनेची नाही तर संविधानाला (Constitution) सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा झालाय. लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सलग होणाऱ्या सुनावणीवर आपली प्रतिक्रिया दिलीय.

शिवसेनेचा (ShivSena) निधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्या खात्यात वळवल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. त्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, जे गद्दार आहेत, त्यांच्याकडं मी काडीमात्र लक्ष देत नाही, त्यांचा पक्षसुद्धा त्यांच्याकडं लक्ष देत नाही. चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आलेलं नाही. त्यांनी नाव, पक्ष सगळे चोरुद्या, पण गद्दारीचा शिक्का तसाच राहील.

Kapil Sibal : “मी ही केस जिंकेन किंवा हरेन, पण घटनात्मक नैतिकता…” अडीच दिवसांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट

व्हिपबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘व्हिप ही पूर्णपणे वेगळी गोष्ट झाली, आमची लढाई लोकशाहीसाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही अजूनही मित्रच आहोत. सरकार असताना सुद्धा आम्ही कधीही सूडबुद्धीनं वागलो नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. माझं आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतंही राजकीय स्टेटमेंट केलेलं नाही. आम्ही जे काही कामं केली, त्याबद्दलच बोललो आहोत.

बीएमसी प्रकल्प रद्द केले जात असल्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आम्ही जे खर्च करत होतो, डेव्हलपमेंट फंड आणत होतो. यांचा डोळा फिक्स डिपॉझिटवर आहे. जेणेकरून ते खर्च करतील आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवतील.

आम्ही जे प्रकल्प राबवणार होतो, ते रद्द करून स्वतःच्या दावोस दौऱ्यावर चाळीस कोटी रुपये 28 तासात खर्च केले. मुंबईकरांसाठीचा पैसा वळवायचा आहे आणि आपल्या तिजोरीत जमा करायचा आहे.

follow us