Download App

अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू ठाम, शरद पवारांनी फिरवला फोन, काय झालं बोलणं?

शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसंच, आंदोलनाबाबत

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar’s call to Bachchu Kadu : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, (Kadu) कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. या

शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसंच, आंदोलनाबाबत माहिती विचारली. यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की, ‘कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसंच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र, मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे.

मोठी बातमी! बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा; म्हणाले

बच्चू कडू यांची प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आहे. त्यांच्या याच मागणीला मनोज जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उद्या (11 जून) दुपारी 4 वाजता मनोज जरांगे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनामुळे त्यांचे वजन दोन किलोंनी घटले आहे. तसंच बच्चू कडू यांचा बीपीही लो झाला आहे. त्यांनी तत्काळ औषधं घ्यावीत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.

follow us