Download App

मित्र पक्षांना विश्वासात न घेताच… सत्तेसाठी काही पण असं होऊ नये; बच्चू कडूंचा भाजपवर आरोप

Bachchu Kadu on NCP Political Crisis : भाजपने राष्ट्रवादीलासोबत घेणे हे थोडं चुकीचंच झालं आहे. यावर विचारमंथन व्हायला हवं होतं. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांची गोची झाली आहे. कारण मविआमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेची काम होऊ देत नव्हती. तसेच ते त्यांच्या मतदारसंघात बांधणी करत होते. असा आरोप शिंदे गट करत होता. मात्र आता या आरोपांनाच छेद मिळाला आहे. अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ( Bachchu Kadu Criticize BJP on Ajit Pawar enter in power )

‘या’ कारणामुळे अजित आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड

पुढे बच्चू कडू असं देखील म्हणाले की, ज्या शिंदेंनी या आरोपांवरून शिवसेनेमध्ये उठाव केला त्यांच्याच डोक्यात कुऱ्डाड मारण्याचा हा प्रकार आहे. त्यांचं आयुष्य जपणं हे भाजपच कर्तव्य आहे. तसेच भाजपने सत्तेसाठी काहीही असं करू नये अशी आम्हाला आपेक्षा आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत घेताना भाजपने मित्र पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत पण ते त्यांनी घेतलं नाही.

आमदारांच्या पत्नींना इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं; अजित पवारांकडून शरद पवारांचा समाचार

मात्र आता यावरून शिंदेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असला तरी ती दाखवता येत नाही कारण आपलेच दात आणि आपलेच ओढ अशी परिस्थिती झाली आहे. तर शिंदे गटाने आता ही भूमिका घेतली आहेच तर या वाटेवर हे काटे देखील त्यांना सहन करावेच लागणार आहेत. त्यांच्या नाराजीला अर्थ नाही. असं देखील यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.

दरम्यान अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us