Download App

दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते; भास्कर जाधवांची पुन्हा खदखद, ठाकरे गटात खळबळ

Bhaskar Jadhav हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी तशा आशयाचे एक स्टेटस ठेवले आहे.

Bhaskar Jadhav Expressed displeasure on Shivsena UBT by Social Media Status : गेल्या काही दिवासांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्या दरम्यान जाधव यांनी देखील नाराजी व्यक्त करणारे वक्तव्य देखील केले आहेत. मात्र त्यावर आपण ठाकरेंवर नाराज नसल्याचं देखील स्पष्टीकरण जाधव यांनी दिलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भास्कर जाधवांची नाराजी समोर आली आहे. कारण त्यांनी तशा आशयाचे एक स्टेटस ठेवले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

दिव्याला तेलाची गरज ही तो तेवत असताना असते. दिवा विझल्यानंतर टाकण्यात आलेल्या तेलाचा काहीही उपयोग नसतो. असं स्टेटस ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी ठेवलं आहे. तसेच माणसांची वेळेत किंमत केली नाही. तर पश्चाताप करून काय अर्थ? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. नाराजीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जाधवांच्या या स्टेटसने ठाकरे गटामध्ये खळबळ माजली आहे. तर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान या नाराजीच्या चर्चांमध्ये आज भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे.

शरद पवार यांना सोडणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक…

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) हे बेधडक आणि बिनधास्त बोलणारे नेते आहेत. शरद पवार यांची साथ सोडणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याची कबुली भास्कर जाधव यांनी दिली आहे. झी 24 तासला दिलेल्या एका मुलाखतीत भास्कर जाधवांनी ही कबुली दिलीय. 2019 मध्ये महाविकास आघाडीसरकारमध्ये तुमच्या मंत्रीपदाला शरद पवार यांनी विरोध केला असेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल हे मला अजिबात वाटत नाही. मी हे दहावेळा सांगितले आहे. पुन्हा तेच सांगतो. जर मी पवारसाहेबांना सोडून मी शिवसेनेत आल्यामुळे त्यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केले आहे. काही चुकीचे त्यांनी केले नसेल.

मोदींनी तुझ्या बापाला 6 हजार पेरणीला दिलेत; लोणीकरांची जीभ घसरली, राजकीय वर्तुळात खळबळ

ज्या माणसांने मला (Bhaskar Jadhav ) पक्षात घेतले. ज्या पक्षात (शिवसेना) मी होतो त्या पक्षाचा उमेदवारी मिळविण्याच्या लायकीचा नव्हतो. शरद पवार यांनी मला त्यांच्या पक्षात घेतले. राज्याचा सरचिटणीस केले. विधानपरिषद मला दिली, निवडून आणले. विधानसभा मला दिली निवडून आणले. मला मंत्रिमंडळात घेतले. मला पक्षाचे अध्यक्ष केले. मला कॅबिनेटमंत्री केले. त्या माणसाला मी सोडल्यानंतर जर त्या माणसाने माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल ते त्यांनी बरोबरच केले, असे ते म्हणाले. मी पवारसाहेबांना सोडून येणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूकच आहे. हे मी शिवसेनेत असताना बोलतोय. कदाचित येथेही मला हे बोलण्याची किंमत भोगावी लागेल, ते म्हणाले.

follow us