Download App

मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर ‘स्वराज्या’ची नांदी; छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आनंदवार्ता…!

  • Written By: Last Updated:

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे.  याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन (Chatrapati Sambhajiraje) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. (Chatrapati Sambhajiraje Swarajya Party)

संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट काय?

आनंदवार्ता…!

स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित ! जय स्वराज्य ! अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर मोठी घडामोड; ‘बीरआरएस’च्या शिलेदारांच्या हाती तुतारी

तिसऱ्या आघडीची स्थापना

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje), राजू शेट्टी, बच्चू कडू (Bachchu Kadu), शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी नुकतीच एकत्रितपणे येत तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती (Pariwartan Mahashakti) असं या तिसऱ्या आघाडीचं नाव असून, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’चे नेतृत्व सामूहिक असेल, असे कडू यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारचे सोशल इंजिनिअरिंग जोरात : चार समाजांसाठी घेतले मोठे निर्णय

26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा…

स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी सांगितले की, येत्या 26 सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्तीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन महाशक्तीमध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.

follow us