Download App

धक्कादायक! शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आपटेला 26 लाख, बाकी राणेंसाठी लोकसभेत खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:

Vaibhav Naik On Chhatrapati Shivaji Mahajar Statue  : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट केला आहे. मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार (Vaibhav Naik) वैभव नाईक यांनी केला आहे. जयदीप आपटेला पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत 26 लाख दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान

निवडणुकीत पैसे वाटप

वैभव नाईक म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यत आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तर जिल्हा नियोजन नमधून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले आहे.

मोदींच्या हेलिकॉप्टरचा खर्च

वैभव नाईक म्हणाले, पाच ते सहा दिवसांनी निलेश राणेंनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचे पुरावे देतो म्हणाले. मात्र, आता एक महिना पूर्ण होत आला तरी पुरावे देऊ शकले नाहीत. लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडून दुसरीकडं वळवण्यासाठी असे आरोप केले. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकलं आहे.

जयदीप आपटे पुरता अडकला; पोलिस कोठडीत वाढ, सावंतवाडी कारागृहात रवानगी

जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, 26 ऑगस्टला ब्राँझचा हा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास 8 दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरुन आपटेला ताब्यात घेतले होते.

follow us