Download App

शेतकरी, कष्टकऱ्यांसह आबाल वृद्धांसाठी आनंदाचं पर्व येवो; गणेशोत्सवाच्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.

  • Written By: Last Updated:

Happy Ganeshotsav from CM Eknath Shinde : आज महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचं आगमन होणार आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. गणरायाचं आगमन सर्वांना आनंदाचे, समृद्धी, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ganeshotsav ) तसंच, हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

श्री गणरायाचं आज आगमन! राज्यात अनेक भागांत पावसाचा कडेलोट, वाचा, आजचा काय आहे अंदाज?

शेतकऱ्यांसाठी आनंदाचं पर्व

गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना केली. गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी बाप्पा चरणी केली आहे.

सामाजिक बांधिलकीची जाणीव

श्री गणेशाचे आगमन दरवर्षी एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येते. यातून मंगलमय, पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. म्हणून जगाचंही महाराष्ट्राकडं लक्ष लागलेले असते. श्री गणेशाला कलाधिपती मानले जाते. त्यामुळे या उत्सव काळात कलाविष्कारालाही उधाण येतं. महाराष्ट्राचा काना कोपरा अशा अविष्कारांनी, उत्साह-जोश यांनी ओसंडून जातो. यंदाही आपण हा उत्सव उत्साहात, जल्लोषात आणि पावित्र्य राखून साजरा करूया. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूया. असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव काळात पुणे शहरासह ग्रामीणमध्ये मद्य विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

महाराष्ट्राचा मानबिंदू

श्री गणेश आपल्याला निसर्ग पूजनाचा संदेश देतात. आपणही पर्यावरणाची काळजी घेऊया. निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देऊया. निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, अशा प्रयत्नांत सहभागी होऊया. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे श्री गणेशाकडून सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा घेऊन राज्यातील सामाजिक सलोखा-बंधुभाव परस्परांतील प्रेम-आदर भाव वाढीस लागेल, असे प्रयत्न करुया असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

follow us