Download App

काँग्रेसच्या जागा कुणामुळे वाढल्या? काँग्रेसचं राऊतांना जशास तसं उत्तर

Balasaheb Thorat replies to Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच धुसफूस वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास (Congress Party) वाढला आहे. काँग्रेसचे नेते आता थेट मुख्यमंत्रि‍पदावर दावा सांगू लागले आहेत. त्यांच्या या दाव्यातील हवा काढून घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केलं. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसनं लक्षात ठेवावे. मुख्यमंत्रि‍पदावर दावा करू नये असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले थोरात?

आमच्या प्रत्येकाच्या जागा एकमेकांमुळे वाढल्या आहेत. संजय राऊत प्रसारमाध्यमांना काहीतरी बातमी द्यायची म्हणून बोलले असतील. महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हाच आमचा शब्द आहे. मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत कोणताच तिढा निर्माण होणार नाही. ज्या जागा जिंकणार आहोत त्या जागांसाठी आग्रही असणं प्रत्येकाच्या दृष्टीने स्वाभाविक आहे, असे थोरात म्हणाले.

Sanjay Raut: बारामतीतून लाडक्या बहिणी अजित पवारांना पराभूत करतील; संजय राऊतांचा घणाघात

follow us