Download App

मोठी बातमी! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार, नुकसानग्रस्तांची भेट घेणार

राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain) या संकटामध्ये शेतकरी कोलमडून गेला आहे. अशा प्रसंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा केला आहे. दरम्यान, आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात साडी नेसवून अवमान केल्यानंतर मामा पगारे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयात असताना गुरुवारी राहूल गांधी यांनी मामा पगारेंशी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्यासोबत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे. 50 वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, तुमचा खूप आदर आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मामा पगारे यांना धीर दिला. तसेच, लवकरच भेट घेणार असल्याचे आश्वासनही दिलं आहे.

राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून बळीराजाची शेती पाण्याखाली गेली आहे. कित्येक शेतातील मातीही पिकांसोबत वाहून गेल्याने जगावं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आता, हा बळीराजा सरकारकडे अपेक्षा लावून बसलाय, अशा परिस्थितीत राहुल गांधी हे परिस्थितीची पाहणी करणार असल्याने ते केंद्र सरकारकडे नुकसानग्रस्तांसाठी काही मदतीची मागणी करतील अशी अपेक्षा सर्वच शेतकरी बांधवांना आहे. राहुल गांधी यांचा दौरा झाल्यानंतर नक्की ते काय बोलतात हे पाहण महत्वाचं असणार आहे.

संकट काळात संपर्क 

संभाव्य परिस्थिती लक्षात घेता, 17 जिल्ह्यांसाठी आपात्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 01. बीड – 02442-299299 02. लातूर – 02382-220204 03. धाराशिव – 02472-227301 04. नांदेड – 02462-235077 05. परभणी – 02452-226400 06. सोलापूर – 0217-2731012 07. पुणे – 09370960061 08. सातारा – 02162-232349 09. अहिल्यानगर – 0241-2323844 10. गडचिरोली – 07132-222031 11. कोल्हापूर – 02312-659232 12. रायगड – 08275152363 13. रत्नागिरी – 0705722233 14. सिंधुदुर्ग – 02362-228847 15. पालघर – 02525-297474 16. ठाणे – 09372338827 17. मुंबई शहर व उपनगर – 1916/022-69403344

यासोबतच मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक 01. 022-22027990 02. 022-22794229 03. 022-22023039 04. 09321587143 आपात्कालीन परिस्थितीत वरील क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

follow us