Dada Bhuse on Farmers’ loan waiver after Confusion in Ajit Pawar’s program : पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमात प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ (Pune) निर्माण केला. हा राडा बच्चू कडूंच्या आंदोलनावरून झाला असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे. बच्चू भाऊंच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार (Bachchu Kadu) कोण? असा सवाल देखील प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यावर आता मंत्री दादा भूसे यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले दादा भूसे?
बच्चू कडू यांचं जे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी तेथे गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यावेळी अजित पवारांनी त्यांना समजावून सांगितले. तसेच या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना चर्चेसाठी पाठवलं होतं. त्यावेळी बच्चू कडू यांनी विचार करून सांगतो असं सांगितलं होतं. त्यांच्या मागण्यांवर एक समिती गठीत करण्याचं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.त्यावर स्वत: बच्चू कडू हे असणार आहेत.
तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शासन सकारात्मक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यावर निर्णय होईल. कारण या सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. त्यामध्ये वीज, पीएम किसान यासह अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या मागण्या केल्या त्यापासून सरकार दूर जात नाही. आमचा त्याला मान्यता आहे. अजित पवारांनी देखील तेच सांगितलं आहे. शेवटी निर्णय हा अभ्यास करून घेतला जाईल.