Download App

यंदाही आषाढीनिमित्त दिंड्याना अनुदान मंजूर, पालख्यांचे प्रस्थानपूर्वी निधी सुपूर्द!

Ashadhi Ekadashi ला जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

grant approved for Dindi on Ashadhi Ekadashi funds handed over before departure of Palakhi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीतील १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील गतवर्षी नोंदणी केलेल्या ९०२ दिंड्याच्या खात्यात हा निधी आज वितरित करण्यात आला आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या दिंड्याना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेण्यात आला होता.

फरहानच्या ‘लक्ष्य’ने गाठलं 21 वं वर्ष : एका तरुणाच्या आत्मशोधाची सैनिक बनण्याची प्रेरणादायी कहाणी

यावर्षीही आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शासनाने घेतलेल्या बैठकीत वारकऱ्यांच्या विविध संघटना आणि प्रमुख दिंड्यांच्या वतीने पुन्हा एकदा तशीच मागणी शासनाकडे करण्यात आली. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा केली.

अहमदाबाद विमान अपघात घटनेत धक्कादायक अपडेट; त्या विमानाचे तीन महिन्यांपूर्वीच…

त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा निधी तत्काळ देण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार मानाच्या १० पालख्यांमधील ११०९ दिंड्याना देण्यासाठी १ कोटी ८० लाख ४० हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गतवर्षी नोंदणी केलेल्या दिंड्याना हा निधी आज वितरित करण्यात आला आहे. तर उर्वरित २९१ दिड्यांचा तपशील येत्या काही दिवसात प्राप्त करून त्यानंतर हा निधी त्यांच्याही खात्यात वर्ग केला जाईल.

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर! बाल वाङमय पुरस्काराचे सावंत तर युवा पुरस्काराचे कोकरे ठरले मानकरी

पंढरपूरकडे पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वीच शासनाने हा निधी मंजूर करून त्याचे वितरण केल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांची ही मागणी पूर्ण करून त्यांना दिलेला शब्द खरा करून दाखवल्या बद्दल तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने शासनाचे आभार मानले जात आहेत.

follow us