Download App

Video : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, आठवड्याच्या सुरुवातीलाच पळापळ, पुढचे काही तास धोक्याचे

पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज इशारा आहे.

Heavy Rain in Mumbai : यावर्षी मान्सून लवकरच धडकला आहे. राज्यभरात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून आला आहे. (Rain) अद्याप जूनचा पहिला आठवडाही आलेला नसतानाच पावसाने सर्वत्र लवकर हजेरी लावली. आज आठवड्याचा पहिलाच दिवस. सर्व मुंबईकर कामासाठी बाहेर पडतात. मात्र, या पावसामुळे सर्व मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने जोरदार सुरावात केली आहे. त्यामुळे साचलेल्या पावसाच्या परिणा रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. हिंदमाता, दादर, परळ परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम; विभागातल्या २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी

त्याचबोरबर यानंतर आय हॉस्पिटल (ग्रँट रोड) येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली.

याशिवाय, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पावासाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसंच, पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार असून सोसाट्याचे वारेही वाहतील असा इशारा देत हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत पावसाची कुठ किती नोंद 

नरिमन पॉईंट – 40 मिमी

ग्रॅण्ट रोड – 36 मिमी

कुलाबा – 31 मिमी

भायखळा – 21 मिमी

मुंबई शहरात गेल्या 24 तासात 58 मिमी इतक्या पावसाची नोंद

पूर्व उपनगरात 19 मिमी पावसाची नोंद

पश्चिम उपनगरात 15 मिमी पावसाची नोंद

सध्याची परिस्थिती पाहता, मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास अंधेरी सबवे, मालाड सबवे, दहिसर सबवे या सर्व ठिकाणी पाणी भरू शकते. त्यामुळे या भागांतून प्रवास करत असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करा. अधिकृत हवामान खात्याच्या सूचना तपासत राहा. दुचाकी किंवा पादचारी मार्गांनी अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

पुढील 3 दिवस कुठे-कुठे ऑरेंज अलर्ट ?

पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज इशारा आहे. मात्र 29 मेनंतर पावसाचा जोर मंदावेल, असा अंदाज व्यक्त होतोय. दरवर्षी प्रतीक्षा असलेला मान्सून रविवारी तळकोकणात दाखल झाला. हवामान खात्याच्या अहवालानुसार मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचली आहे. हा मान्सून येत्या तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

follow us