Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत मी 29 ऑगस्टनंतर मी कोणाला जवळ येऊ देणार नाही. सरकारने येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा असं म्हटले आहे. जरांगे पाटील आज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी 29 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही शब्द बोलणार नाही. आजपासून तीन महिने मी कोणालाही काहीही बोलणार नाही. सरकारने येत्या 30 जूनच्या अधिवेशनात आमचा विषय मार्गी लावा. आम्ही गुलाल घेऊन येतो पण 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईत यायची वेळ येऊ देऊ नका. जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाही. असा इशारा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.
आजी-माजी आमदारांना फोन करणार
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना 14 जूनपासून फोन करणार आहे. आम्ही प्रत्येक आमदाराला अंतरवाली सराटीमध्ये बोलवणार आहोत. आम्ही विधानपरिषदेच्या आमदारांना देखील बोलवणार आहोत. यात आजी- माजी आमदार, खासदार असणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिली. तसेच मराठा आणि कुणबी एक आहे. त्यांच्या नोंदी देखील सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करण्यात यावा आणि सगेसोयरे मुद्यांची अंमलबजावणी करण्यता यावी अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना सरकारकडे केली आहे.
ऑपरेशन सिंदूननंतर पहिल्यादांच 5 ऑक्टोबरला भारत- पाकिस्तान भिडणार , ICC ची मोठी घोषणा
सर्व सात कोटी मराठा मुंबईत असतील
आमच्या नावावर सातबारा असेल तर शेत मोजून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आरक्षम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. 29 ऑगस्टनंतर मी कोणालाही जवळ येऊ देणार नाही. यावेळी दहापट मराठा मुंबईत येणार. सर्व सात कोटी मराठा हे मुंबईत असणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.