Download App

राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र

Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना 2024 च्या निवडणुकीआधी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय’, असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करत या दोघांची चौकशी करून नार्को चाचणी करा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी एटीएसला पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राम मंदिराच्या उद्घाटनावेळी ट्रेनवर दगडफेक करुन दंगल केली जाईल; राऊतांचा खळबळजनक आरोप

राणे म्हणाले, ‘संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे असो हे दोघेही पाकिस्तानचे एजंट आहेत का? असा संशय येतोय. याचे कारण, ज्या राम मंदिरासाठी देश हा आतुरतेने वाट पाहत आहे. 2024 च्या सुरुवातीलाच रामभक्त अयोध्येत दाखल होणार आहेत. त्याचवेळी हे दोघंही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात. रामभक्तांवर हल्ले होऊ शकतात अशी वक्तव्ये करत आहेत. हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आनंदाच्या क्षणात या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची. उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकावण्याचाच आहे.’

‘काही महिने अगोदर खासदार धैर्यशील माने यांनी उल्लेख केला की काही वर्षांपूर्वी सांगलीत जी दंगल घडली होती त्यामागे संजय राऊतचा हात होता असे खासदार माने म्हणतात. माझा मुद्दा असा आहे की दोन्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जर कुणी भारताविरोधात कट रचत असेल, दंगली भडकण्याची माहिती त्यांच्याकडे असेल तर ती पोलिसांना देणे ही देखील जबाबदारी असते.’

पालकमंत्र्यांनी निधी वळविला; चंद्रकांतदादा जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार : धंगेकर आक्रमक

संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे जर राम मंदिर अयोध्येकडे जात असताना दंगल भडकण्याची माहिती असेल तर तत्काळ सरकारी यंत्रणांना माहिती दिली पाहिजे. आता मी स्वतः एटीएसला पत्र लिहीणार आहे आणि अशी मागणी करणार आहे की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची सखोल चौकशी करा वाटत असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा. यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करून दंगली थांबवाव्यात अशी मागणी मी करणार असल्याचे राणे म्हणाले.

Tags

follow us