Maharashtra Flood CM Devendra Fadnavis Letter To Amit Shah : महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी केली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र ( Devendra Fadnavis Letter To Amit Shah) पाठवले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ही भेट पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रामध्ये राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून जनतेला माहिती (Maharashtra Flood) दिली आहे.
पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील 31 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतीला प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या अखेरीपर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे सुमारे 50 लाख हेक्टर शेतीची जमीन नुकसानग्रस्त झाली आहे. या घटनेमुळे (Ndrf Relief Fund) लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी SDRF मधून 2,215 कोटी रुपये वाटप केले आहेत. मात्र, आपत्तीचे प्रमाण अत्यंत मोठे असून हवामानाचा अंदाज पाहता परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात… pic.twitter.com/oj0FECpyYd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2025
1. अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठे नुकसान
– महाराष्ट्रातील 31 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पावसामुळे शेतीला प्रचंड नुकसान झाले असून लाखो शेतकऱ्यांची उपजीविका प्रभावित झाली आहे.
2. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मदत
-राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत 2,215 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाटप केले आहे.
3. केंद्र सरकारकडून NDRF मधून अतिरिक्त मदतीची मागणी
– नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व्यापक आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तू, पशुधन हानी भरपाई आणि नुकसानग्रस्त मालमत्तेची पुनर्बांधणी करण्यासाठी NDRF मधून अतिरिक्त मदत मागितली आहे.
4. हवामानाचा अंदाज आणि परिस्थितीची गंभीरता
-हवामान विज्ञानाचे पूर्वानुमान दर्शवतात की परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत गरजेची आहे.
5. पत्राद्वारे केंद्र सरकारकडे विनंती
-राज्य सरकारच्या संसाधनांनिशी पूर्ण मदत पुरवण्यासाठी NDRF अंतर्गत अतिरिक्त आर्थिक सहाय्य लवकरात लवकर केंद्राकडे विनंतीसह प्रस्ताव पाठवला आहे.