Maharashtra Rain : नागपुरात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. काल शुक्रवारीही दिवसभर अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची […]

आनंदवार्ता! महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन; आज मान्सूनने राज्यात घेतली एन्ट्री

आनंदवार्ता! महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन; आज मान्सूनने राज्यात घेतली एन्ट्री

Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. काल शुक्रवारीही दिवसभर अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. रायगड, भंडारा, गोंदियात तुरळक पाऊस होईल. नागपूरात सध्या प्रचंड पाऊस सुरू आहे.

पुढील दोन दिवसात (25 आणि 26 सप्टेंबर) अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात रविवारी पावसाचा (Pune Rain) यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दिवशी पुणे शहरात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतही रविवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसे पाहिले तर यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस सोडले तर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला. आता सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी पाऊस होत असला तरी तो अत्यंत अल्प आहे. मोठ्या पावसाची अनेक ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे. आता जो पाऊस होत आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होईल याची वाट पाहिली जात आहे. समाधानकारक पाऊस झाला तर खरीप पिकांना जीवदान मिळेल. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल त्यामुळे या काळात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Rain : पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार

नागपुरला झोडपले, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो

नागपूरला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले. फक्त 4 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. नागपूर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या लोकांना आधी तातडीने मदत करावी अशा सूचना दिल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Exit mobile version