Download App

Manipur violence : मणिपूरमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 26 विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार

Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे.

दरम्यान मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आता या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उद्या दुपारपर्यंत राज्य सरकार विमानाने महाराष्ट्रात आणणार आहे. एकूण 26 विद्यार्थी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत फोनवरून चर्चा केली. त्यावेळी या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत करण्याचं अश्वासन दिलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. लवकरच या विद्यार्थ्यांचा तेथून सुटका करण्यात येईल असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विशेष विमान सायंकाळी 6.30 वाजता मुंबईत दाखल होणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता हे विमान गुवाहाटी येथून मुंबईकडे प्रयाण करणार आहे. मणिपूरच्या इंफाळ येथून हे विद्यार्थी गुवाहाटीकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दंगलग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमित शाह हे राज्य आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. अमित शाह दिल्लीत आहेत आणि मणिपूरमधील परिस्थितीबद्दल सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांकडून नियमित अपडेट घेत आहेत. शुक्रवारी शांतता होती मात्र वातावरण तणावपूर्ण होते.

Tags

follow us