तुमचा हा विषयच नाही, तुम्हाला हे चौथी नापास मंत्री पुढं घालत आहेत. पण तुम्हाला मी सन्मानाने सांगतो तुम्ही (Jarange) या भानगडीत पडू नका अशा शब्दात जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू हे चर्चेला आले असा संवाद साधला. तसंच, गेल्या तीन वर्षात पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कधीही चर्चेला आलेले नाहीत. मग आत्ताच तुम्हाला का पुढं घातलं जात आहे असा प्रस्नही जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. ते अंतरवाली सराटीत उपोषणस्थाळावरून बोलत होते. दरम्यान, जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषण सोडण्याचा प्रस्ताव फेटाळल्याने जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांना रिकाम्यान हाताने परतव लागलं.
दरम्यान, याच दिवशी म्हणजे तीन वर्षांपूर्वी आमच्यावर मोठा लाठीचार्ज केला. आमच्या लेकरांसह माता माऊल्यांची डोकी फुटली, कुणाचे हात मोडले, कुणाचे पाय मोडले. आमच्या डोळ्याने आमच्या लोकांच्या रक्ताचा चिखल आम्ही पाहिलाय असं बोलताना जरांगे पाटील अक्षरश: ढसाढसा रडले. यावेळी काहीवेळ मोठ शांततेचं आणि भावनिक वातावरण निर्माण झालं होत.
माजी आमदार शहाजी बापू जरांगेंच्या भेटीला; थेट मंत्री शंभूराज देसाईंना फोन लावत म्हणाले
जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाली आहे. आज त्यांनी उपचारही घेतले नाहीत. सर्व लोकांसमोर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आता उपोषण सोडवाव. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही उद्यापासूनच पूर्ण करण्यास सुरूवात करणार आहोत असं आश्वासनही आशिमा मित्तल यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या लोकांना तुम्ही जरांगे पाटील यांना उपोषण सोडवण्यासाठी विनंती करा असं आवाहनही केलं.
जे उपोषण सुरू आहे ते तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आहे. सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक आहे. संविधानिक चौकटीला धक्का न लावता सर्व मागण्या सरकार मान्य करण्यास तयार आहे. यातील महत्वाची मागणी म्हणाजे, ज्या बांधवांनी या आरक्षण लढ्यात बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत आणि ज्यांनी नोकरी द्यावी यासाठी मागणी केली त्यांचाही सकारात्मक विचार सुरू आहे. दुसरी जी मागणी आहे की 58 लाखातील सर्व नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळावं तर त्यासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर आम्ही काम करू असं आश्वासनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिलं आहे.
