Manoj Jarange News : मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केलीयं. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोरेंची अरेरावी थांबेना! तुझी अवस्था तुषार खरातसारखी करेन म्हणत मंत्री जयकुमार गोरेंची सामाजिक कार्यकर्त्यास धमकी
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं.
फडणीससाहेब गर्वात वागू नका…
सार्थीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती भेटली नाही. सत्ता जात असती देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जास्त गर्वात वागू नका. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा. 58 लाख प्रमाणपत्राच्या व्हॅलिडीटी तात्काळ देण्यात यावा. आमचा हक्क आम्हाला देण्यात यावा आमचा हक्क रोखू नका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
अमायरा म्हणजे महाराष्ट्राने खूप काय दिलं त्याची परतफेड; सुभाष घईंनी व्यक्त केली कृतज्ञता
तसेच तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे. नेत्यांचं ऐकून जातीवाद हा शिक्षणात आणू नका. सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी. तुम्ही आमचा हक्क नाकारू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 58 लाख पुरावे सापडले आहेत.मी मॅनेज होणारातला नाही. मराठा समाजबांधवांचा मी एकनिष्ठ असल्याचं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे. 28 ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, 58 लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे ह खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.