Download App

जलील औरंगाबादमध्ये जन्मले, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मरतील, राजा सिंह ठाकुरांचा जालीलांना टोला

  • Written By: Last Updated:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चात राजा सिंह ठाकुर यांनी आज भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, हे औरंगजेबचे अवलाद आहे. यांनी यांचा बाप पहिले सिद्ध करावा कोण आहे, हिंदू गर्जना जमा होत आहे. तेव्हा या ठिकाणीचे जनता पाहून औरंगजेबची अवलाद सुद्धा विचारात पडली असेल. जे औरंगाबादमध्ये जन्मले, ते आता मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मरतील असा टोला यावेळी ठाकूर यांनी लगावला. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी आम्ही कित्येक वर्षांपासून संघर्ष करत आहोत आणि आज ते झालं आहे.

आज त्यावरून तुम्ही विरोध करत आहात जो त्याच्या स्वतःच्या घरच्यांचा झाला नाही. अशाचं नाव या शहराला देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरत आहात हे चुकीचे आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झालं तर तुमचा तळफळाट झाला.

उस्मानाबादचे नाव धाराशिव झाल्यामुळे आपला तगमग सुरू आहे. जो औरंगाबादचे नाव देण्यासाठी समर्थकरण व छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांचा नामोनिशाण मिटवले जाईल, अशी प्रतिक्रिया राजा सिंह ठाकुर यांनी दिली.

Tags

follow us