Download App

आमच्या लोकांना दगाफटका करणारं विश्वासघातकी सरकार, गुन्हे मागे न घेतल्यानं जरांगेचं टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : आम्ही शातंतेत आंदोलन करत होता तेव्हा तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, इतकं दगाफटका करणारं निष्ठूर सरकार पहिल्यांदाच पाहिलं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते आज जालन्यात बोलत (Jalna News) होते.

Jitendra Aavhad : भगीरथ बियाणींचा मृत्यू कसा झाला? आव्हाडांची मुंडेंवर ‘त्या’ प्रकरणावरून टीका 

काही दिवसांपूर्वी अंतरवलीतील मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला होता. या घटनेत अनेकांवर गुन्हे नोंदवले गेले. अंतरलीतील दगडफेकीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलकांसह जरांगेवर कडवी टीका केली होती. आंदोलकांनीच दगडफेक केल्यानं पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचं ते म्हणाले होते. यावर आता जरांगेंनी भाष्य केलं.

ते म्हणाले, जर २४ डिसेंबरला राज्य सरकारने दगाफटका केला तर आंदोलन काय असतं, ते दाखवून देऊ. ओबीसीतून आरक्षण घेऊनच राहणार. तुम्ही आमच्याशी दगाफडका करू नका. तुम्ही स्थानिक पोलिसांकूडन आमच्यावर हल्ला केला. आम्ही शातंतेत बसलो होतो. तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला.. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, हा डाव सरकारचाच आहे. इतकं दगाफटका करणारं निष्ठूर आणि विश्वासघातकी सरकार पहिल्यांदाच पाहिलं, आम्हाला जेलमध्ये टाका, तुमच्या इच्छा पूर्ण करा, मग तुम्हाला मराठा समाज ऊस तोडायला लागवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगेनी दिला.

Ahmednagar : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक! …तर मनपा अधिकाऱ्यांना काळे फासणार

सरकारला करायची ती सगळी मदत केली. दोन दिवसात अंतरवलीतील गुन्हे मागं घ्या, एका महिन्यात राज्यातले गुन्हे मागे, घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसीतूनच आरक्षण घेणार. सरकार आरक्षण कसं देत नाहीत, ते मराठा समाज बघतो. आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. काय व्हायचं ते होऊ दे… दबावामुळं आरक्षण मिळत नसेल तर एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित दादांना विनंती आहे, की याच्या (भुजबळांच्या) दबावात येऊ नका, असंही जरांगे म्हणाले.

यावेळी त्यांनी भुजळांवरही टीका केली. तो अंबडला आले आणि माझ्यावर पाचवी शिकला अशी टीका केली. हे जास्त शिकलं तरी बेसन खाऊ आलं, अशी ऐकेरी टीका जरांगेनी केली. सगळ्या दुनियेचं खातो, महाराष्ट्र सदन खाल्ल, आता जाऊन आला… माझ्या नादी लागूच नका, मी सर्वच बाहेर काढेल, असा इशारा त्यांनी दिला.

छगन भुजबळ कलंक लागलेला मंत्री आहे. ते दंगली घडवण्याचं काम करत आहे, हा घटना पायदळी तुडवणारा मंत्री आहे, अशी टीकाही त्यांनी केला.

Tags

follow us