Download App

शिंदेंविरूद्ध 50 खोक्यांच्या घोषणा देणाऱ्यांना किती खोके दिले? मेहबूब शेख यांचा अजित पवार गटावर हल्ला

NCP Politicle Crises : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. एकीकडे अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. तर दुसरीकडे वायबी सेंटरवर शरद पवारांची बैठक सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी बोलताना अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ( Mehbub Shaikh Criticize Ajit Pawar Group in NCP Political Crises)

दादा किती दिवस तुम्ही गप्प राहणार आज बोलूनच टाका; धनंजय मुंडेंची चौफेर फटकेबाजी

काय म्हणाले मेहबूब शेख?

यावेळी बोलताना शेख शरद पवारांना म्हणाले की, अजित पवारांसोबत गेलेल्यांना ईडीचा धाक असला तरी शरद पवार सर्वांचे बाप आहेत तसेच शरद पवारांसोबत जे आहेत ते निष्ठावंत आहेत. तर जे शरद पवारांना सोडून गेले आहेत. ते गुत्तेदार आणि लाभार्थी आहेत. तसेच जे लोक सोडून गेले ते कावळे आहेत. तर जे शरद पवारांसोबत आहेत ते मावळे आहेत अशी टीका यावेळी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी अजित पवार गटावर केली आहे.

आमदार बनवणारा देवच आमच्याकडं, शशिकांत शिंदेंनी अजित पवार गटाला डिवचलंच…

पुढे ते असं देखील म्हणाले की, पवार साहेबांना सोडून गेलेला नेता कधीही जास्त काळ टिकत नाही. तसेच ते म्हणाले की, ज्यांच्यासाठी शरद पवारांनी बाप म्हणून कष्ट घेतले त्यांनी आता आधाराची गरज आहे. त्यावेळी सोडून जात आहेत. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. तर ते तुरूंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेले आहेत. हेच भाजपविरोधात बोलत होते. ते आता भाजपसोबत गेले. तर जे गद्दार एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यावर 50 खोकेंच्या घोषणा देत होते. त्यांना आता विचारावं लागेल की, त्यांना किती खोके दिले. अशी घणाघाती टीका मेहबूब शेख यांनी अजित पवार गटावर केली आहे.

Tags

follow us