Download App

हिंदी भाषा सक्तीची अनिवार्य असा शब्द कुठंय?, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मंत्री भुसेंचा प्रतिसवाल

सध्या हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. त्यावरून आता राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्या कलगीतुरा रंगलाय

  • Written By: Last Updated:

Dada Bhuse Reply on Raj Thackeray Hindi Language : हिंदी भाषा राज्यात इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यापासून वाद सुरू झाला होता. मराठी जणांसह मनसेनेही यामध्ये जोरदार विरोध दर्शवला होता.(Hindi) प्रमुख राज ठाकरे यांनी दोनवेळा पत्रही पाठवल संबंधीत मंत्र्याला. मात्र, यावरून सरकारने माघार घेतली नसल्याचं बोलल जातय. त्यावर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारला थेट इशारा दिला. हिंदीची सक्ती कुठं केली असा उलट सवाल करत दादा भुसे यांनी उत्तर दिली आहेत.

मंत्री दादा भुसे यांनी, नवीन शासन निर्णय आला त्यात अनिवार्य शब्द कुठं आहे असा सवाल विरोधकांना विचारला आहे. पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील त्यांना मराठी बंधनकारक आहे.इयत्ता ५ वी पासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे. काही भाषिक शाळा आहे, त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून असं शिकवलं जातंय, असं भुसे म्हणाले.

पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेला आहे. अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. तिसर्‍या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील त्यांना शिकवलं जाणार आहे, मात्र किमान २० विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Video : तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोहच  समजू; गर्भित इशारा देत राज ठाकरेंचं शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र

मराठी शिकवणं सुरू केलं नाही तर अशा शाळांची मान्यता देखील रद्द केली जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय, तेच मी सांगतोय. मराठी ही भाषा होतीच आणि इंग्रजी आणि तिसरी भाषा असे सूत्र होते. इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा स्विकारले आहे. त्यात काय नवीन नाही आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषेचा अवलंबत्व केले आहे.

आपण तिसर्‍या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे. शास्त्र असं बोलतं लहान मुलांची ग्रास्पिंग पावर जास्त असते. लहान मुलांचं शिक्षण घेणं मोठ्या प्रमाणात आहे. लहानपणापासून विद्यार्थ्याला भविष्याचे गुणांकन होणार आहे. विद्यार्थी मेरीटमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण त्रिभाषा सूत्री करतोय. भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल ती भाषा आम्ही देऊ. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचे वाटेल ती तिसरी भाषा देऊ

अनेक लोकांशी संवाद झाले. चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे हा हेतू आहे. मराठी बंधनकारक करतोय, महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे. गर्जा महाराष्ट्र माझा शिकवणार आहे हे का आपण बघत नाहीत, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

follow us