Download App

वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, आझमींचे वादग्रस्त विधान, फडणवीसांनी केली सडकून टीका

पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. त्याला मुस्लीम बांधव विरोध करत नाही. मुसलमानांनी मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जातात.

  • Written By: Last Updated:

Abu Azmi on Wari : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. आझमी यांनी आषाढी वारीबाबत (Ashadhi Wari) हे विधान केलं. वारीमुळे रस्ते जाम होतात. हिंदूंचे सण रस्त्यांवर साजरे केले जातात, तेव्हा मुस्लीम व्यक्ती विरोध करत नाही. पण जेव्हा मुस्लिम रस्त्यांवर नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात, असं आझमी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वादंग निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दहाच आमदार…अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू? जयंत पाटलांचा मिश्किल टोला 

रविवारी सकाळी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात अबू आझमी यांनी पत्रकार परिषद घेतली. इस्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आझमी यांनी इराणच्या समर्थनार्थ विधान केलं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना भारतात आश्रय दिला होता. सध्याच्या भारतीय पंतप्रधानांनी इराणला पाठिंबा द्यावा, असंही आझमी म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, आम्ही मशिदीबाहेर नमाज पठण करू शकत नाही… आज मी पुण्याहून येत होतो. तेव्हा लोकांनी मला सांगितले की पालखी निघणार आहे. त्यामुळं लवकर जा. नाहीतर रस्ता जाम होईल. पालखींमुळे रस्ता जाम होतो, रस्त्यावर अनेक हिंदू सण साजरे होतात, हिंदू सणांविरुद्ध कोणताही मुस्लिम व्यक्ती तक्रार करत नाही. कोणत्याही मुसलमानाने तक्रार केलेली नाही की रस्त्यावर उत्सव का साजरा केला जातो? मग जेव्हा मुस्लिम व्यक्ती रस्त्यावर दहा मिनिटासाठी नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जात आहेत, असं ते आझमी म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत का? छगन भुजबळांचं क्लिअर उत्तर, म्हणाले, “आम्हाला वाटतं की..” 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या सध्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. यादरम्यान, आझमी यांनी वारीबाबत हे वादग्रस्त विधान केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकीही देत ​​आहेत, असे अबू आझमी म्हणाले. तसेच देशात नमाज पठणासाठी जमीन जाणूनबुजून कमी केली जात आहे, असंही आझमी यांनी म्हटले आहे.

आझमी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांना अबू आझमी यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता असल्या बालिश वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणार नाही, असं ते म्हणाले. प्रसिध्दीसाठी अबू आझमी अशी विधाने करत असतात. मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. मी अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

follow us