Download App

मोदी म्हणजे देश नव्हे, नाना पाटोलेंचा मोदींसह भाजपवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी मोदीसह भाजपवर सडकून टीका केली. बोलताना नाना म्हणाले मोदींचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान नव्हे, मोदी म्हणजे काय देश नव्हे. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार रोवला गेला. त्या महाराष्ट्रसह देशातून भाजपाची हकालपट्टी व्हावी असा संकल्प यानिमित्ताने करायचा आहे.

यावेळी नानांनी मोदी आणि अडाणीला टार्गेट केले. लोकशाहीच्या सर्व व्यवस्था मोडून काढण्याचे काम सध्या या देशात सुरु आहे. मोदींचे आणि अदानींचे काय संमंध आहेत हे साऱ्या देशाला माहित आहेत. मोदी आणि अडाणी मिळून देशाला लुटत आहेत.  LIC मधील लोकांच्या पैशाची उधळपट्टी मोदी आपल्या मित्रांसाठी करत आहेत. अडाणी आणि मोदी मिळून जनतेचे पैसे लुटत आहेत. असा आरोप देखील यावेळी नानांनी केला.

यादेशात आता भाजप आणि मोदींनी लोकशाही शिल्लक ठेवली नाही, BBC बाबत बोलताना नाना म्हणाले एक आंतरराष्ट्रीय चॅनल देखील आपल्या देशात बॅन केलं जात आहे, म्हणजे देशात लोकशाही राहिली नसून आता हुकूमशाही आलेली आहे. असा टोला मोदींना लगावला. जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा मालिन करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजपने केलं आहे.

Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका! 

देशातील लोकसभेत आणि राज्यसभेत आमच्या नेत्यांना बोलू दिल जात आणि मागच्या आठवड्यात राहुल गांधी आणि मालिकाअर्जुन खर्गे यांचे भाषण पटलावरून काढून टाकले. त्यामुळे असे जाणवत आहे कि या मोदींनी आणि भाजपने देशात हुकूमशाही आणली आहे.

महाविकास आघाडी बाबत बोलताना नाना म्हणाले महाविकास आघाडीच्या भव्य दिव्य सभा पुढील काळात आपल्याला करायच्या आहेत. सर्वसामन्यापर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पोहचायचं आहे. उद्धव ठाकरेंच्या खेडच्या एका सभेने राज्यातील भाजप घाबरली आहे. असे नाना म्हणाले

 

 

 

Tags

follow us

वेब स्टोरीज