Download App

Union Budget 2023 : बजेटवर Nana Patole म्हणाले.., आकर्षक घोषणा, आकड्यांचा खेळ अन्..

मुंबई : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलीकडं अर्थसंकल्पात काहीही ठोस नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलंय.

पटोले म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा याच कार्यपद्धतीचा भाग असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

तसेच अर्थसंकल्पात महागाई, शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्दही अर्थमंत्र्यांनी काढलेला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केलं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटंलय.

त्याचप्रमाणे, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीगडमध्ये काँग्रेस सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे दबावात केंद्र सरकारने आयकरात 50 हजाराची सवलत दिली, पण ती घोषणा फसवी असल्याचं त्यांनी म्हंटलंय. पण ती घोषणाही फसवीच आहे.

नव्या आयकर योजनेनूसार ज्यांचे उत्पन्न 10 लाख रुपये आहे, त्यांच्यावर 13 हजार रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेत गृहकर्जावरील आयकर लाभ, 80C, 80D, 24B या कलमान्वये मिळणारी कोणतीही सवलत मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

अर्थसंकल्पात महिलांच्या बचतीवर जास्ती व्याजदराचे आणि सवलतीचे आमिष दाखवणे ही भाजपची घोर फसवणूक असून सरकारने एलपीजी सिंलिंडरची किंमत आणि महागाई कमी करण्यासंदर्भात काही उपाययोजनांची घोषणा केली पाहिजे होती, असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.

मनरेगासाठीची तरतूद 1 लाख 10 हजार कोटी रूपयांवरून 60 हजार कोटी रूपयांवर आणली आहे. तर शिक्षण आणि आरोग्यावरील तरतूदीत काहीही वाढ केलेली नसल्याचंही पटोलेंनी म्हंटलंय.

सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पात डिझेल, पेट्रोलचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र, सरकारने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा केलीय. सर्वाधिक कर महाराष्ट्र केंद्राला देतो, मात्र या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळालेले नसल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, या अर्थसंकल्पातून अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदार, तरूण, महिला यांच्यासह मध्यमवर्गाचीही घोर निराशा केली आहे.

Tags

follow us