Download App

Nitesh Rane : राऊतांनी ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची सुपारी घेतली…

संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी घेतली, त्यांनी किती दलाली घेतलीय सांगावं, या शब्दांत भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर घणाघात केला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीवरुन संजय राऊतांनी टीका केलीय. त्यानंतर राणेंनी त्यांचा समाचार घेतला.

Raavrambha: सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड…; ‘रावरंभा’ नेमका कसा आहे? पाहा रिव्ह्यू…

आमदार नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हे 2014 ते 2019 काळातील एनडीए सरकारचे मंत्री होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राऊतांचे सर्वच लाड पुरवले आहेत. संजय राऊतांच्या मालकालाही मोदींच्याच आशिर्वादाने आमदारकी मिळाली आहे. त्यानंतर ठाकरेंच्या राक्षसी महत्वकांक्षीमुळेच भाजप-सेनेची युती तुटली असल्याची टीका त्यांनी केलीय.

.. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो; आंबेडकरांनी सांगितंल गाठीभेटी वाढण्याचं कारण

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी सुरु आहे, ठाकरे गटातील नेते कोणी कोणत्या जागेवर आगामी निवडणूक लढवायची याबाबत चर्चा करीत आहे. संजय राऊत ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी दलाली करीत असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

पाचच दिवसांनी शिंदे-फडणवीस पुन्हा नगरला; निळवंडेतील पाणी सोडण्याची चाचणी

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीचं अस्तित्व संपत चाललं आहे त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीच्या काळात ज्या दंगली झाल्या हिंदुंवर अत्याचार झाले त्याला संजय राऊतांचे मालक उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या मालकांचा मुलगा राज ठाकरेंना भेटून मदत मागण्याचा प्रयत्न करतो, त्यावर संजय राऊत काहीच बोलत नाहीत. संजय राऊत जी दलाली करीत आहेत तेच राऊत ठाकरे कुटुंबिय फोडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Tags

follow us