Download App

नगरचं पाणी जायकवाडीला मिळणार का? विखेंच्या बैठकीत आ. काळेंचा खास प्लॅन !

Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन दिवाळीत संघर्ष धुमसू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू नये अशी मागणी करत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. नाशिक जिल्ह्यातून थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल झालेली असतानाच नगर जिल्ह्यातही संघर्ष खदखदू लागला आहे. उद्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या अध्यक्षतेत कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याआधीच विरोधाचा आवाज वाढला आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करून जायकवाडीला पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून घेणार असल्याचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

Nashik News : पाण्याचं भांडण थेट कोर्टात! जायकवाडीला पाणी देण्याविरोधात याचिका

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जलसपंदा आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. नगर नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याला विरोध होत आहे. तर दुसरीकडे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. अशा परिस्थितीत उद्या होणारी ही बैठक वादळी ठरण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून 500 दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून 2643 दलघफू, मुळा समुहातून 2100 दलघफू, प्रवरा समुहातून 3360 असे नाशिक आणि नगर जिल्ह्यातून एकूण 8603 दलघफू पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्या भाजपा आमदार आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला. आंदोलनेही करण्यात आली.

Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध, आंदोलन, तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार

नाशिककरांची थेट सुप्रीम कोर्टात धाव 

जर जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास त्याचा मोठा फटका नगर आणि नाशिक जिल्ह्याला बसेल. येथेही दुष्काळसदृश्यच परिस्थिती आहे. पाणी कमी झाल्याने पिके संकटात सापडतील. तसेच सध्या पाणी सोडले तर 30 ते 40 टक्के पाण्याचा अपव्यय होईल असे सांगण्यात येत आहे. या समस्या टाळण्यासाठी जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्याची मागणी आता होत आहे.

अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात आमदार फरांदे यांच्या नेतृत्वात थेट न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आता पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर अमृता पवार यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडू नये यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

Tags

follow us