Download App

“फडणवीस CM झाल्याने बरं झालं, मागचा अडीच वर्षांचा काळ वाईट”, महाजनांनीही काडी टाकली

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.

Girish Mahajan on Eknath Shinde : राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारमधील धुसफूस काही संपत नाही. सरकारमधील मंत्री आणि नेते वेळोवेळी असंतोषाला वाट करुन देत असतात. आताही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या (Girish Mahajan) वक्तव्याने महायुतीत अस्वस्थता वाढणार हे निश्चित मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.

जळगावात भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाजनांनी शिंदेसेनेला जोरदार टोला लगावला. महाजन पुढे म्हणाले, सध्या भाजपकडे सर्वाधिक पंचायत समित्या आहेत. ग्रामपंचायतींचे सरपंचही भाजपाचेच जास्त आहेत. आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत. जिल्हा परिषदेतही भाजपचे सदस्य असले पाहिजेत. जळगाव आणि नाशिक महानगरपालिकांत भाजपने उच्चांक गाठला पाहिजे.

“आपण महायुतीत आहोत, नितेशनं जपून बोलावं”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भावाचा नितेश राणेंना सल्ला

यानंतर महाजनांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. कुणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. त्या भानगडीत आपण पडायचं नाही. आता जे बडबड करत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे याची माहिती तु्म्हालाही आहे. ज्यांना कुणीच विचारत नाही असेच लोक प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलत असतात. आपल्याला बोललं म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळते, असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांना लगावला.

यानंतर त्यांनी मागील अडीच वर्षांच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळावरही टीका केली. महायुतीत असताना त्यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तो काळ चांगला होता. पण मधला अडीच वर्षांचा काळ (एकनाथ शिंदे) आपल्यासाठी खूप वाईट होता. त्यानंतर मात्र आपल्याला स्पष्ट बहुमत मिळालं. याआधी कधीही घडलं नव्हतं असं घडलं. या निवडणुकीत आपले 132 आमदार निवडून आले, असे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“जागावाटपात ओढाताण झालीच तर शरद पवारांचा सल्ला घेऊ”, फडणवीसांचा खोचक टोला

follow us