Download App

अहमदनगरमधील व्यापारी वैतागले, दिले फडणवीस यांना थेट निवेदन

Devendra Fadanvis : अहमदनगर शहरात सध्या दहशत आणि गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जाते आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने टारगेट करून नगरची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे. हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याकडे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने जातीने लक्ष घालून नगर शहरातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी करणारे निवेदन शहरातील व्यारपाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

मध्यंतरी नगरच्या दोन व्यापाऱ्यांना किरकोळ पार्किंगच्या कारणावरून मारहाण करून त्यांच्यावर तलवारीने हल्ला झाला काही व्यापाऱ्यांना रस्त्यात किरकोळ भांडणाचे कारण काढून बेदम मारण्यात आले. या विरोधात एक दिवस नगर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना आपली बाजारपेठ निषेध करण्यासाठी बंद करावे लागणे. ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. या संदर्भात तीव्र शब्दात निषेध करत असून आपण जातीने लक्ष न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. तरी आपण वैयक्तिक लक्ष घालावे ही विनंती. असं निवेदन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.

Tags

follow us