मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही पण…, पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यावर टीका करणे

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यावर टीका करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच जर या दौऱ्यावर 30 लाख कोटींचे एमओयू झाले असतील तर ही आनंदाची बाब असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तर दुसरीकडे राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली. तसेच अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये (Prithviraj Chavan) करार करणे हा एक क्रूर विनोद असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस (Davos) दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर 30 लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आनंदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे.

ते म्हणतात की, आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.

बांगलादेशला सम्मान द्या, भारताचा उल्लेख करत शाहिद आफ्रिदी ICC वर भडकला…

महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या दावोसमध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?

Exit mobile version