Download App

बारसूला जाण्याच्या मनाई आदेशाविरोधात, राजू शेट्टींची जिल्ह्याधिकाऱ्यांना नोटीस

  • Written By: Last Updated:

शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार असून आपण यामध्ये मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

नुकतेच राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. तसेच सोशल मीडीयावर देखील कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यास देखील मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या नोटीसला राजू शेट्टी यांनी अॅड असिम सरोदे यांच्या मार्फत उत्तर पाठवले आहे.

यामध्ये म्हटलेले आहे की, राजू शेट्टी चळवळीमध्ये तसेच सक्रिय राजकारणात कधीच असंसदीय शब्दांचा वापर नाही केला. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. तसेच त्यांना सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया देणेस मनाई केले आहे.

भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देणेचा अधिकार आहे. राजू शेट्टी यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही असिम सरोदे यांनी दिला आहे. तसेच राजू शेट्टी हे बारसू येथील अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे त्यांनी कळवले आहे.

Tags

follow us