Download App

Video: बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल तर आम्ही काय?..राऊतांचा अमित शहांवर वार

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसंच मुंबई बाबातच्या त्यांच्या विधानाचाही समाचार घेतला.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Amit Shah’s Bombay Statement : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, बॉम्बे नको मुंबई हवी, अशी मागणी झाली, तेव्हा मीदेखील ही मागणी करणाऱ्यांमध्ये होतो, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार! मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू, पाच ते सहाजण जखमी

बाळासाहेब ठाकरे यांचं काम

आज मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शाह यांच्या वाक्याचा चांगलाच समाचार घेतला. बॉम्बेचं मुंबई करण्यात अमित शाहांचं योगदान असेल, तर आम्ही काय त्यावेळी गोट्या खेळत होतो का? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसंच, बॉम्बेचं मुंबई व्हावं, मुंबईतील दुकांनांवरील पाट्या मराठीत व्हाव्या, यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन केलं होतं. असंही राऊत यावेळी म्हणाले.

हास्यास्पद विधान

राम नाईक, पीबी सांमत यासारख्या नेत्यांनी हा विषय न्यायालयात नेला होता. त्यावेळी लढ्यात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले होते. मात्र, तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता आणि यावरून भाजपाचे लोक मुर्खासारखे टाळ्या वाजवतात, हे सगळंच हास्यास्पद आहे, असा घणाघातही राऊत यांनी यावेळी केला.

निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान

आमच्यात ती क्षमता आहे

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईत निर्माण झाली आहे. हे हुतात्मे मराठीत होते. यापुढे जेव्हा मुंबईवर हल्ला होईल, तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि असली शिवसेनेत आहेत, हे अमित शाह यांनी लक्षात ठेवावं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

follow us