Download App

‘…शिवसैनिकांचा हिसका दाखवला जाईल ; शरद कोळींचा इशारा 

सोलापूर : युवा सेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) ताफ्यावर औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान दगडफेक झाली. खरे तर डीजेचा कारण नाही, या हल्ल्याच्या पाठीमागे गद्दार, भाजप, शिंदे गट, (Shinde group) मिंदे गट या लोकांनी हा एकदम हल्ला करण्याचा षडयंत्र सुरू केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या संरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील शंका आहे, कारण हे अधिकारी देखील सध्या शिंदे गटाचे इशाऱ्यावर चालतेत का ? पोलिसांना कसे माहित नाही, असा सवाल शरद कोळी यांनी यावेळी उपस्थित केला.

 

यापुढे जर असे काही प्रकार घडल्यास तर महाराष्ट्रात राख रांगोळी शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गटाला यावर त्यांनी बजावून सांगितलं आहे की, तुमच्यात जर दम असेल तर तुमची माकड, डुक्करासारखी माणसे सत्तेचा गैरवापर करत आहात. तुम्हाला जर सत्तेचा एवढा माज आला असेल तर तुमची झेड सिक्युरिटी काढून मैदानात या मग तुम्हाला शिवसैनिकांचा (Shiv Sainik) हिसका दाखवला जाईल असा इशारा दिलाय.

या सभेच्या दरम्यान त्याच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आदित्य ठाकरे महालगावात पोहोचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. परंतु सभा सुरू होण्याच्या दरम्यान रमाईंची मिरवणूक सुरु झाली होती. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.

या सभेमध्ये शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यामुळं यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये, म्हणून हे कारस्थान केल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आंबादास दानवे यांनी देखील केली.

Tags

follow us