Download App

भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना केले लक्ष्य, रोहित पवारांचा आरोप

  • Written By: Last Updated:

काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील कालिचरण या महाराजांनी महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत ते म्हणाले होते की नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीं बाबत जे केले ते योग्य होत. त्यावरून रोहित पवारानी खरपूस ट्विट करत कालिचरण महाराजांचा समाचार घेतला तसेच नाव न घेता पवारांनी सत्ताधार्यांना ही लक्ष्य केले.

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात…

श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध!
पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय…

भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत, जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं!

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले 

निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय… पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत…

 

Tags

follow us