Download App

Balasaheb Thorat म्हणाले…पहिले विखे पळाले, नंतर मी खिंड लढवली

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी थोरात यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा चांगलाच समाचार घेतला. नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून विखे यांनी थोरातांवर खिंड सोडून पळाल्याची टीका केली होती. याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून अहमदनगर जिल्ह्यत सुरु झालेलं राजकारण अद्याप तापलेले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे खिंड न लढताच पळून गेले होते अशी टीका केली होती.

दरम्यान यावर आता थोरात यांनी पलटवार करत विखे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. खिंड तर माझ्याकडे नंतर आली. पहिले पळाले हे. नंतर मी खिंड लढवली. 2019 साली पहिले पळाले ते. ते विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्रातली काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ती सांभाळली नाही. पण, वेळ आली तेव्हा ते पळून गेले. अशी टीका थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलीय.

तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले, आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. मुळात ते राज्याचे मंत्री असले तरी फारसे कोठे जात नाहीत. याच भागात फिरतात. कोठे गेलेच तर तेथे गेल्यावरही किमान अर्धातास माझ्यावरच बोलतात. अशा शब्दात थोरात यांनी विखेंना खडेबोल सुनावले आहे.

Tags

follow us