CM Fadnavis meets Raj Thackeray : राज्याच्या राजकारणातसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या (Thackeray) एका बैठकीत उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांच्या भोटवीर ते मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी ट्रॅफिकच्या संदर्भात मला काही सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचं मी स्वागत करतो. कारण अशा प्रकारे ट्रॅफिकच्या संदर्भात कोणी सूचना करत असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
पटोले काय म्हणाले ?
भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. ही निवडणूक आणि मतदान दिल्लीत होणार आहे. मग, भाजप आतापासूनच फडणवीस यांच्यावर जबाबदारी का देत आहेत. त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी आहे का, असा खोचक सवाल काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.