Thackeray is brand! एकच अन् एकत्रित मोर्चा… संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ

Sanjay Raut Tweet united march against compulsory Hindi in Maharashtra : राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण (Hindi Compulsory In Maharashtra) तापलेलं आहे. आझाद मैदानावर 5 जुलै रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने या मोर्चाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा जाहीर केलाय. तर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) सूचक ट्विट केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलंय, ते आपण पाहू या.
संजय राऊतांचं सूचक ट्विट
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित असलेला फोटो ट्विट करून त्यात एकच मोर्चा निघेल, असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत! महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र, असं संजय राऊतांनी म्हटलंय. राजकीय गोटात संजय राऊत यांचं ट्विट सूचक असल्याचं बोललं जात आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच संजय राऊतांच्या या ट्विटमुळे आणखी जास्त लक्ष वेधलं गेलं आहे.
जय महाराष्ट्र!
“There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!”
@Dev_Fadnavis
@AmitShah pic.twitter.com/tPv6q15Hwv— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
महाराष्ट्र द्रोहींचा प्रचंड जळफळाट
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विट बघून महाराष्ट्र द्रोहींचा प्रचंड जळफळाट झाला असेल. कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
शिंदेंच्या’मार्गां’ची अजित पवारांकडून कोंडी? महायुती सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण
गिरगाव चौपाटीवरून मोठा मोर्चा
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठी माणसाचा मोर्चा असेल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक, वकील यांना सहभागी व्हा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा कट उध्वस्त करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.