Download App

युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट कंत्राटदारांकडूनच; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने 25 वर्षे मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं न मिळत नाहीत म्हणून थयथयाट सुरू आहेच. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय? असा सवाल करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) खरपूस समाचार घेतला. मोर्चाला नाव मुंबईकरांचे आणि चर्चा कंत्राटांची अशी, टीका त्यांनी केली. (Ashish Shelars criticism of Aditya Thackeray over his speech in the Mumbai march)

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उबाठा गटाच्या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये मुंबईकरांची काळजी कुठे होती? यालाच कंत्राट का? म्हणजे याचा अर्थ यांच्या कंत्राटदारांना का नाही? हा काय मुंबईकरांसाठी विचारलेला प्रश्न नव्हता. एवढे रस्ते कशाला? एवढी स्ट्रीट फर्निचरची खरेदी कशाला? म्हणजे मुंबईकरांसाठी फर्निचर खरेदी केली ती यांच्या कंत्राटदारांकडून का नाही असेच ना? हे काही मुंबईकरांचे प्रश्न नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Samrudhi Highway Accident : ‘देवेंद्रवासी’ म्हणत मृतांची चेष्टा योग्य? पवार साहेबांच्या शब्दांत निकष लावला तर… भाजपचं टीकास्त्र 

स्ट्रीट फनिर्चरच्या खरेदीची चर्चा करता. मग ईडीमध्ये समोर आलेले युसूस फनिर्चरवाल्याच्या फ्लॅटमध्ये कोविड काळात देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याची जी माहिती उघड होतेय, यावर का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले, मुंबईच्या रस्त्यांची कामे आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करणाऱ्या कंपन्या करतात, चांगल्या दर्जाचे रस्ते, विस वर्षांची हमी घेऊन केली जात आहेत. रस्त्यांची कामे करताना युटिलिटी डक तयार केले जात आहेत. याकडे दुर्लक्ष करून आजच्या मोर्चात सगळी चर्चा कंत्राटदारांची पहायला मिळाल्याचा घणाघात शेलारांनी केला.

कोविड काळात मुंबईच्या बिल्डरांना 50 टक्के प्रिमियम मध्ये सूट देण्याची खैरात केलीत, त्यामुळे मुंबई महापालिकेचे 12 हजार कोटींचे नुकसान झाले. ताज हाँटेलला सुट दिलीत ही पालिकेच्या तिजोरीची लूट नाही का? तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही ‘चोर मचाज शोर’ हे जे तुम्हाला म्हणतोय तेच मुंबईकरांना पटेल, अशा शब्दात आमदार अँड आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला

Tags

follow us