Download App

एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक

Girl Murder मुंबईतील उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Girl Murder in Navi Mumbai Accused arrested from Karnataka border : छत्रपती संभाजी नगर येथे आंतरजातीय प्रेम विवाहातून ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच, मुंबईतील (Navi Mumbai ) उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या (Girl Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना नुकतच पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय.

जयंत पाटलांच्या वक्तव्याने मोठी खळबळ; म्हणाले, धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी….

काय आहे नेमकं प्रकरण?

उरण येथे राहत असलेली यशश्री शिंदे नावाची तरुणी बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती. मात्र गुरुवारी सकाळी कामावर गेलेली यशश्री घरी परतलीच नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यावेळी तपास दरम्यान पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ एका झुडपात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.

मास्क, टोपी अन् दिल्लीतील बैठका; महायुतीतील एन्ट्रीचा किस्सा अजितदादांनीच सांगितला..

या मृतदेहाची विटंबना केलेली होती. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. मात्र कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलीच्या वडिलांनी दाऊद शेख या इसमावर या हत्याचा आरोप केला आहे. तसेच ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली असावी. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दरम्यान पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत असताना बंगळूर येथे हा संशयित आरोपी पळून जात असल्याचा समोर आलं. त्यावेळी पोलिसांनी त्याला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्याने तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने वैद्यकीय चाचणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे देखील समोर आल्यास. तो गुन्हा देखील दाखल होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

follow us