Download App

17 रुग्णांचा मृत्यू; ‘डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर लाथा मारुन हाकलून द्या’, आव्हाडांचा संताप

Kalwa Hospital News : डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर त्यांना लाथा मारुन हाकलून द्या, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा घटनेवर संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन आव्हाडांनी संताप व्यक्त करीत प्रशासनावर निशाणा साधला आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादी भाजपसोबत? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला…

पुढे बोलताना ते म्हणाले, मी म्हणजे इथल्या शासनातला कोणी नाही. सर्वच रुग्णांच्या मृत्यूची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. या दुर्देवी घटनेनंतर आयुक्त, पालकमंत्र्यांनी आत्तापर्यंत रुग्णालयात यायला हवं होतं, पण कोणालाही जबाबदारीची जाणीव नाहीये, लोकांच्या मृत्यूबद्दल खंतही नसलेली ही बेशरम माणसं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.

अमेरिकेतील हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांचा आकडा 89 वर, शोध मोहिम सुरू

तसेच यांच्या भावना मेलेल्या आहेत. याचं ह्रदय झिजलेलं आहे एकाच दिवशी 17 रुग्णांचा मृत्यू हे कुठल्याही शहाण्याला न पटणारं नाही. महापालिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, त्यांना लाजच नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महापालिकेकडून इथल्या डॉक्टरांना राजाश्रय दिला जात आहे, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. हे लोकं घाबरणारच नसतील तर ते असंच करणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं आहे. दरम्यान, महापालिका काहीही कारवाई करणार नसून रुग्णालयातल्या डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर त्यांना लाथा मारुन हाकलून द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Tags

follow us