(प्रशांत गोडसे, विशेष प्रतिनिधी)
मुंबई : भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज (Mohit Kamboj) सोशल मीडियावरून अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर सुरू आहे. X वरील त्यांचे अधिकृत हँडल सध्या उपलब्ध नसल्याचे अनेक युजर्स सांगत असून, यामागे नेमकं कारण काय याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
MSRTC White Paper : लालपरी अडचणीत! एसटी महामंडळाला १०,३२२ कोटींचा तोटा, श्वेतपत्रिका जाहीर
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले इन्फ्लुएंसर गजाभाऊ यांनीच थेट दावा करत ट्विट केलं आहे – “मोहित कंबोजला पोरांनी इतका त्रास दिला, बिचारा अकाउंट बंद करून निघून गेला! परत ये, परत ये मोहित कंबोज परत ये!”
त्याचबरोबर गजाभाऊने मोहित कंबोज यांचं “माय नेक्स्ट टार्गेट गजाभाऊ” हे ट्विट डिलीट केल्याची आठवणही करून दिली. या पोस्टमुळे पुन्हा एकदा गजाभाऊ विरुद्ध कंबोज ट्विटर युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कंबोज यांचे X अकाऊंट खरंच बंद?
गजाभाऊच्या ट्विटनंतर अनेक युजर्सनी मोहित कंबोज यांचे अकाऊंट शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या ते X वर अनुपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं. हँडल @mohitbharatiya_, जे पूर्वी सक्रिय होतं, ते आता दिसत नसल्याने, अकाऊंट डिलीट झालं की तात्पुरतं डिऍक्टिव्ह केलं गेलं, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही.
सिगारेट दिली नाही म्हणून संतापला… धारदार शस्त्राने केली महिलेची हत्या, अल्पवयीन तरूणाचा प्रताप
गजाभाऊ विरुद्ध कंबोज: ट्विटर वॉर थांबणार की भडकणार?
गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज आणि गजाभाऊ यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच खडाजंगी रंगली होती. टोकाच्या भाषेत एकमेकांवर निशाणा साधणारी ट्विट्स, डिवचणं, प्रत्युत्तरं यामुळे दोघांचे समर्थक दोन गटात विभागले गेले.
कंबोज यांच्या अकाउंटच्या अनुपस्थितीने या वादावर पडदा पडतो की नव्या वळणावर जातो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कंबोज परत येणार की ‘एक्सला’ला कायमचा निरोप?
मोहित कंबोज यांचं अकाउंट बंद करणं केवळ तांत्रिक कारणामुळे झालं की त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला, हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या सोशल मीडियावरील शांततेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
गजाभाऊचा सडेतोड टोमणा आणि त्याचा सोशल मीडियावर होणारा प्रभाव, हे सगळं पाहता – कंबोज परत येतात की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे