Download App

मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा! चहल, सुधाकर शिंदेंची बदली करा, वडेट्टीवारांची मागणी

Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की मुंबई महानगर पालिकेतील सनदी अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. निवडणूक आयोगाने सांगून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत. मुख्यमंत्र्यांवर या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे का? मुख्यमंत्र्यांचा कोणी हात धरला आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे सरकारने या अधिकाऱ्यांच्या वेळीच बदल्या केल्या पाहिजेत तरच मुंबईतील निवडणुका फ्री अँण्ड फेअर वातावरणात पार पडतील. सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाल पत्र पाठविले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Bihar Politics : PM मोदींच्या सभेत चिराग ‘इन’; नितीश ‘आऊट’; बिहार NDA मध्ये पुन्हा धुसफूस?

मुंबईतील साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले असून यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होत असताना हा घोटाळा होतो. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे आएएएस नसताना देखील मोठ्या पदावर आहेत. हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात. हे अधिकारी निधी वाटपात दुजाभाव करू शकतात. निवडणुकीदरम्यान प्रभाव पाडून शकतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले पाहिजे. मुंबई महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. मुंबई साफ करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. सरकारने याला वेळीच आळा घातला पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

‘अजितदादा अन् शिंदेंचे उमेदवार ‘कमळावर’च लढणार’; बच्चू कडू यांचा मोठा दावा

त्यांनी पुढं म्हटले की साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. या चावी वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. हे चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक युपी मधील आहेत.

या प्रकरणात १० कोटीच्या ५३ सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली गेली आहेत. हे हिमनगाचे टोक असून शेकडो कोटींचा यामध्ये घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआटीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याला कोणाचा आशिर्वाद आहे हे समोर आले पाहिजे. अधिकारी आणि लोकप्रतिनीधींनी संगनमताने केलेला हा घोटाळा आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्विस्ट!

follow us