Download App

शेतकऱ्यांच्या बांधावर काँग्रेसची फौज, 34 नेते 34 जिल्ह्यांत अवकाळीची पाहणी करणार

Nana Patole : अवकाळी पाऊस व गारपिटीने (Unseasonal rain) राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने (Natural disaster) शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस नेते (Congress) शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. यासाठी 34 नेते 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. परिस्थितीची पाहणीकरुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यासाठी नेत्यांना जिल्हावार जबाबदारी दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मंत्री नसीम खान यांना ठाणे, माजी मंत्री बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, आमदार प्रणिती शिंदे लातूर, आमदार कुणाल पाटील अहमनगर, माजी मंत्री सुनिल केदार वर्धा, माजी मंत्री यशोमती ठाकूर अकोला, विधान परिषद गटनेते सतेज पाटील सातारा, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम सोलापूर अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

चार राज्यात PM मोदींचा झंझावती प्रचार दौरा, मिझोराममध्ये एकही सभा का घेतली नाही?

तर माजी मंत्री वसंत पुरके चंद्रपूर, माजी मंत्री पद्माकर वळवी धुळे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख बुलढाणा, आमदार सुभाष धोटे गडचिरोली, आमदार संग्राम थोपटे सांगली, प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर परभणी, आमदार अभिजीत वंजारी गोंदिया, आमदार रणजित कांबळे अमरावती, आमदार राजेश राठोड धाराशीव, आमदार ऋतुराज पाटील रत्नागिरी, आमदार अमित झनक यवतमाळ, आमदार धीरज देशमुख बीड अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र…

आमदार रविंद्र धंगेकर कोल्हापूर, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील नंदूरबार, माजी खासदार हुसेन दलवाई पालघर, सुरेश टावरे रायगड, नाना गावंडे भंडारा, संजय राठोड जळगाव, माजी आमदार हुस्नबानो खलिफे सिंधुदुर्ग, माजी आमदार विरेंद्र वाशीम, माजी आमदार विजय खडसे हिंगोली, माजी आमदार नामदेवराव पवार हे जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Tags

follow us