Download App

शेकडो लोकांच्या मृत्यूनंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय, 15 टक्के…

Air India reduce international flights by 15 percent : गुजरातमधील अहमदाबाद अपघातापासून एअर इंडिया (Air India) नेहमीच चर्चेत आहे. गुजरातमधील एअर इंडियाच्या विमान अपघात आणि त्यानंतर विमानांमध्ये (Ahemdabad Plane Crash) वारंवार होणारे बिघाड हे यामागील कारण असल्याचे मानले जाते. अहमदाबाद घटनेनंतरही अनेक उड्डाणांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळेच एअर इंडियाने आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या या निर्णयामागे सुरक्षा तपासणी, तांत्रिक मूल्यांकन आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावासारखी अनेक कारणे आहेत. अहमदाबादमध्ये नुकताच झालेला विमान अपघात हे या निर्णयामागील सर्वात मोठे कारण असल्याचं मानलं जातंय.

सेवा 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय

एअर इंडियाने सांगितले की, पुढील काही आठवड्यांसाठी वाइड-बॉडी विमानांसाठी आंतरराष्ट्रीय सेवा 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 20 जूनपासून केली जाईल. डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग 787-8/9 विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तपासणीचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरिक्त खबरदारी म्हणून एअर इंडिया त्यांच्या बोईंग 777 विमानांची देखील तपासणी करेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या बंगल्यात मोठा स्फोट, आग लागून किचन खाक

एअरलाइनने म्हटलंय की, आम्ही प्रवाशांना सहकार्याचे आवाहन करतो. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, याची खात्री देतो. आम्ही लवकरच स्थिरता पुनर्संचयित करू. AI 171 मधील 241 प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत. एअर इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटलंय की, ज्यांच्या विमान प्रवासात या कपातीचा समावेश आहे आणि ज्यांच्यावर याचा परिणाम झाला आहे. त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल. याशिवाय, त्यांना प्रवासासाठी इतर पर्याय देखील दिले जातील.

काळा कपड्यातल्या मांत्रिक अन्… अघोरी पूजा करताना मंत्री भरत गोगावले? नवीन व्हिडिओ चर्चेत

विमान अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू

12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI171 ला उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या अपघातात एकूण 297 जणांचा मृत्यू झाला. विमानात एकूण 242 जणांपैकी 241 जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला. एअर इंडियासंबंधी 12 जूनपासून बातम्यांमध्ये आहे. कधी आपत्कालीन लँडिंगमुळे तर कधी तांत्रिक बिघाडांमुळे कंपनीला त्याचा फटका सहन करावा लागतो. या सर्वांमुळे गेल्या 1 आठवड्यात कंपनीला 80 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या सततच्या घटनांनंतर प्रवाशांना बोईंग विमानांबद्दल अस्वस्थता वाटत आहे.

 

follow us