Download App

…तर इथं एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन.., रामदेव बाबांचं वादग्रस्त विधान

जळगाव : बागेश्वर बाबानंतर आता योगगुरु बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. जळगावमधील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा –लबाना -नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदेव बाबा बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना रामदेव बाब म्हणाले, हिंदूधर्म केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदुधर्म विश्वधर्म एक युगधर्म आहे. सनातन म्हणजे नित्य, शास्वत धर्म आहे. त्याला कुठलिही शक्ती मिटवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुणी अग्नी, जल, वायु आणि पृथ्वीचा धर्म बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे कुणीही हिंदूधर्म बदलू शकत नाही हे शास्वत सत्य असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

तसेच भारतातील एकही व्यक्ती आपल्या इच्छेने मुस्लिम बनला नाही, तर जबरजस्तीने मुस्लिम बनवले आहे. आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. आपसातील सर्व भेदभाव विसरुन समस्त हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. एकमेकांच्या संकटात मदतीसाठी धावून जाणे हाच आपला धर्म असल्याचं रामदेव बाबांनी स्पष्ट केलंय.

आम्ही जर भेदभाव केला असता, तर ख्रिश्चन धर्मीय इथे एकही पाऊल पुढे टाकू शकला नसता. जर आम्ही हत्यार उचलले असते, तर इथे एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असंही ते म्हणालेत. दरम्यान, हिंदु धर्म हा एक विश्व धर्म आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us