Corona Active Cases : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, दिल्ली (Delhi) सारख्या राज्यात आता पुन्हा एकदा कोरोना पाय पसारतोय. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 360 नवीन रुग्ण सापडले आहे. त्यामुळे आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3758 पेक्षा जास्त झाली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत केरळ राज्यात सर्वाधिक 1400 रुग्ण आढळले आहे तर महाराष्ट्रात 841 आणि दिल्लीत 436 रुग्ण आढळले आहे.
तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये (Kerala) एकाचा तर कर्नाटकामध्ये (Karnataka) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये 63 वर्षीय पुरुषाचा तर केरळमध्ये 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे 28 मृत्यू
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात सर्वाधिक मृत्यू केरळ आणि महाराष्ट्रात झाले असून दोन्ही राज्यात 7-7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासांत 383 जण कोरोनातून बरे झाले आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 1818 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
JN.1 व्हेरियंट वाढत आहे…
माहितीनुसार, देशात आता ओमिक्रॉनचा नवीन सब- व्हेरियंट JN.1 पाय पसरत आहे. हा व्हेरियंट सुरुवातीला केरळ राज्यात आढळला होता. तर आता हा व्हेरियंट हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. सध्या या व्हेरियंटची प्रकरणे वाढत आहे. माहितीनुसार, कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरतो, त्यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
22 मे पर्यंत सक्रिय रुग्ण 257
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात 22 मे पर्यंत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 257 होती मात्र 26 मे रोजी ही संख्या 1010 वर पोहचली आणि 31 मे रोजी संख्या 3395 वर पोहचली आहे. तर 1 जूनपर्यंत ही संख्या 3758 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घाला आणि गर्दी टाळा तसेच हात धुण्याची सवय ठेवा.
1 जूनपर्यंत कोणत्या राज्यात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण
केरळ : 1400
महाराष्ट्र : 814
दिल्ली : 436
गुजरात : 320
बंगाल : 287
कर्नाटक : 238
तामिळनाडू : 199
उत्तर प्रदेश : 147
हसन मुश्रीफांच्या हातातच आता कोल्हापूरच्या ‘चाव्या’, किरीट सोमय्या ते फडणवीस…
राजस्थान : 62