Download App

उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’

Heat Wave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळतो आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेक ठिकाणी राज्यात तापमानाचा पारा देखील वाढाला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमान वाढत आहे. यातच हवामान विभागाने महत्वाचा अलर्ट दिला आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे.

देशातील अनेक राज्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षांच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता विद्यार्थ्यांना ऊन वाढण्यापूर्वी घरी पाठविले जात आहे.

‘या’ राज्यांना हाय अलर्ट
आंध्रप्रदेश शिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडीशा व उत्तर प्रदेश अशा आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेमुळे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. सकाळी आठ वाजता जारी करण्यात आलेल्या वार्तापत्रानुसार उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यांतील गंगेच्या किनाऱ्यावरील भागांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात बंगालमध्ये गेले आठ, तर बिहारमध्ये गेले पाच दिवस उष्णता कायम आहे.

ईशान्य, उत्तर, पूर्व आणि मध्य या विभागांतील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. हिमालयाच्या पश्चिम विभागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बुधवारी काही भागांत थंड हवा आणि हलक्या पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

उष्णतेची लाट…राज्यांच्या उपाययोजना
पश्चिम बंगाल : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा.
दिल्ली : दुपारच्या वेळेत शाळेत मुलांना एकत्र आणण्याचे उपक्रम आयोजित करू नयेत.
बिहार : बुधवारपासून शाळांमधील सर्व वर्ग सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत संपवावेत आणि शाळा सोडावी असे आदेश.
त्रिपुरा : राज्यातील सर्व सरकारी शाळा २३ एप्रिलपर्यंत बंद ठेवाव्यात असा आदेश.
मेघालय : बुधवारपासून तीन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला.
ओडिशा : राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रे चार दिवस बंद ठेवण्याचा आदेश सरकारने जारी केला.

Tags

follow us