आता जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन टायगर; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा खळबळजनक आरोप

मी केंद्र सरकारला त्यांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. पण आता परिस्थिती बदलली असून आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

News Photo   2026 07 11T214850.496

आता जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन टायगर; मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा खळबळजनक आरोप

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (kashmir) यांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अब्दुल्ला यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हजरतबल येथे बेगम अकबर जहाँ अब्दुल्ला (मादर-ए-मेहरबान) यांच्या 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उमर अब्दुल्ला यांनी दावा केला की, जम्मू विभागातील नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराला पक्षांतर करण्यासाठी 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

पुढे बोलताना विरोधकांवर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले की, ‘ते पुन्हा एकदा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहिती मिळाली आहे की जम्मूतील आमच्या एका आमदाराला 20-30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आमदाराने ही ऑफर नाकारली.’ यावेळी अब्दुल्ला यांनी ऑफर मिळालेल्या आमदाराचे नाव किंवा ही ऑफर देणाऱ्या व्यक्तींचे नाव उघड केलेले नाही.

Operation Tiger 3: ऑपरेशन टायगर 3, ठाकरेंना पुन्हा धक्का; 10 आमदार सोडणार साथ?

उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, ‘नॅशनल कॉन्फरन्सने संघर्षाऐवजी संवादाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी जवळपास दोन वर्षे प्रयत्न केले. मी केंद्र सरकारला त्यांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. पण आता परिस्थिती बदलली असून आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.’ आता उमद अब्दुल्ला यांनी 20 जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनातून जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर आरोप करताना म्हटले की, ‘भाजपने पक्षांतराच्या माध्यमातून मागच्या दाराने सरकारमध्ये प्रवेश करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. जर तुमची हीच भूमिका असेल, तर सार्वजनिकपणे जाहीर करा की भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाणार नाही.

Exit mobile version