Download App

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात; 24 जुलैला सुनावणी

Mumbai serial blasts प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला त्याला महाराष्ट्र सरकारने आव्हान दिले आहे.

Maharashtra Government chalengeto HC decision Accused in Mumbai serial blasts acquitted : मुंबईत (Mumbai) 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumbai serial blasts) सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. मात्र आता या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. त्यावर 24 जुलैला सुनावणी पार पडणार आहे.

‘मला दोष मुक्त करा’, वाल्मिक कराडचा अर्ज; पण न्यायालयाने… उज्वल निकमांनी काय सांगितलं?

महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Mumbai serial blasts) मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.  त्यावर 24 जुलैला सुनावणी पार पडणार आहे. सर न्यायाधीस बी आर गवई यांच्या खंडपीठा पुढे ही सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरणं काय?

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत सात स्फोट (Mumbai serial blasts) झाले होते. या हल्ल्यात 189 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 827 नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तपास करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

हनीट्रॅप प्रकरणात ट्विस्ट! करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट, पीडितेलाच आणले समोर; आरोपांनी उडाली खळबळ

सत्र न्यायालयाने 2015 मध्ये 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. यामध्ये पाच जणांना फाशी, तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दोषींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. राज्य सरकारने मात्र फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठी याचिका दाखल केली होती.

सबळ पुराव्यांचा अभाव

मुंबई उच्च न्यायालयाने आज सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केलं की, या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे, तथ्यहीन आणि विसंगत होते. त्यामुळे कोणत्याही आरोपीला दोषी ठरवता येत नाही. यामुळे 19 वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा शेवट न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणातील एक आरोपी तपासादरम्यान मरण पावला होता. उर्वरित आरोपी नाशिक, अमरावती, नागपूर आणि येरवडा जेलमध्ये होते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थिती लावली होती. आजच्या निर्णयामुळे ते सर्व आरोपी आता तुरुंगाबाहेर येणार आहेत.

follow us